शेतीला अतिशय कमी पाणी उपलब्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी विटा भागात द्राक्षबागा जगवायला मोठा संघर्ष करवा लागतोय. पण गेल्या ४ वर्षांपासून द्राक्षशेतीला रासायनिक खतांचा वापर बंद करुन अतुल बाबर यांनी सध्या प्रतिदिन प्रतिवेल अवघ्या १ लिटर पाण्यात द्राक्षबागेचा हंगाम घेतलाय. एरव्ही हेच व्यवस्थापन करायला त्यांना ७ ते ८ लिटर पाण्याची गरज भासली असती.