मोदी हटाव शेतकरी बचाव, इडा टळो बळीचे राज्य येवो, अशा घोषणा देत शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक त्वरित रद्द करावीत, अशी मागणी करत केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.<br /><br />बातमीदार - संदीप खांडेकर<br />व्हिडीओ - मोहन मेस्त्री