महाविकास आघाडी सरकार ची वर्षपूर्ती झाली असुन हे सरकार पाडण्याची स्वप्ने विरोधकांनी पहावीत असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. कोरोना काळ,चक्रीवादळ,अवकाळी पाऊस अशा अनेक गोष्टींवर मात करुन हे सरकार सामान्य जनतेला न्याय देण्यात यशस्वी ठरले असल्याचा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार मध्ये एवढे अनुभवी नेते असल्यामुळे हे सरकार ५ वर्षे नव्हे तर पुढील काही वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.
