त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता. करवीर तालुक्यातील कसबा बावडा येथे राजाराम बंधा-यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भारतवीर मित्र मंडळ आणि आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्याने याठिकाणी दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त याठिकाणी अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.