महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये चक्क अलीकडे प्रेमाचे करार होत आहेत. प्रेमाच्या संकल्पनेला छेद देत तरुणाई एकापेक्षा अधिक बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड ठेवण्याकडे अधिक झुकत चालली आहे. या सर्वांचे पर्यवसन नैराश्यामध्ये होऊ लागले आहे. नैराश्याने ग्रासलेल्या मुलांमुळे पालकांच्या चिंता वाढल्या असून पालक या मुलांना घेऊन समुपदेशकांचे उंबरठे झिजवत आहेत.
