मार्चमध्ये सुरु झालेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून ते सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही एक गोष्ट समान आहे ती म्हणजे परराज्यात होणारे मजुरांचे, कामगारांचे स्थलांतर. कोरोनाच्या भीतीने, काम थांबल्यामुळे, घरातल्यांच्या आग्रहामुळे अनेक जण प्रशासनाच्या मदतीने तर हजारो जण मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी जाणारे कामगार देशभर दिसून आले. पुण्याजवळच्या भोसरी, रांजणगाव , चाकण, इंदापूर, बारामती या एमआयडीसीमधून लाखो कामगार आपापल्या गावी निघून गेले. त्यामुळे सुरु झालेल्या कंपन्यांमध्ये प्रॉडक्शन सुरु करताना अडचणी निर्माण होत आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही कामगार थांबले आहेत. एकीकडे सरकार घराबाहेर जाऊ नका असे सांगत असताना गावाकडे कोरोना कशाला घेऊन जायचा असा त्यांचा सवाल आहे. महाराष्ट्रात काम करताना मिळणारी सुरक्षितता, प्रतिष्ठा यावरही ते समाधानी आहेत. इतकेच नव्हे तर तिकडे काम नाही तर जाऊन करायचं काय असा त्यांचा थेट सवाल आहे. या कामगारांनी आपल्या भावना लोकमत डॉट कॉमशी बोलताना व्यक्त केल्या.<br />#LokmatNews #lockdown #coronavirusindia <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat