अयोध्येतली बाबरी मस्जीद पाडल्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानी लखनौमध्ये आज आपला निकाल जाहीर केला. ६ डिसेंबर १९९२ साली ही मस्जीद पाडली गेली होती. या खटल्यात एकूण ४९ आरोपी होते. मात्र त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला. २८ वर्ष चाललेल्या या खटल्यातून उरलेल्या सगळ्या, म्हणजे ३२ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलंय. यात माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार, कल्याण सिंग यांसारख्या मोठ्या नेत्याचा समावेश आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुरेंद्रकुमार यादव यांनी हा निकाल जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर यादव हे निवृत्त होत आहेत. तब्बल २८ वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल ३१ ऑगस्टपर्यंत लावण्यात यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानी दिला होता. पण २२ ऑगस्ट रोजी एक महिन्याची मुदतवाढ मिळून, शेवटी हा निकाल २० सप्टेंबरला लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निकाल देताना न्यायमूर्ती म्हणाले की बाबरी मस्जीद पाडण्याचा पूर्व नियोजित कट नव्हता आणि तसे पुरावेही न्यायालयासमोर आले नाहीत. उलटपक्षी लालकृष्ण अडवाणी आणि विनय कटियार यांनी संतप्त जमावाला बाबरी मस्जीद पाडू नका असं म्हणत रोखण्याचा प्रयत्न केला होता, असं निकालात म्हटलंय, पहा या बाबतच हा सविस्तर विडिओ - <br /><br />#Lokmat #BabariMasjid #Demolition #YogiAadityanath #Uttarpradesh #Ayodhya<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat