<br />आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या १५ वर्षांमध्ये अखंड भारत दिसेल, या वक्तव्यावर उपहासात्मक पद्धतीने टीका केली आहे. “आता तुमचेच स्वयंसेवक सत्तेत आहेत, त्यामुळे ही अखंड भारत करून दाखवायची वेळ आहे,” असं तोगडिया म्हणाले.
