वटपौर्णिमेला वटसावित्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या काही काळापासून रुढ आहे. यंदा १४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वटपौर्णिमेला वटसावित्रीची कथा ऐकल्यावर व्रत कसे पूर्ण होते? त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#Vatpurnima #Vatpurnima2022 #Vatpurnimapooja #Lokmatbhakti #VatSavitriVratKatha <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा