परमेश्वराला नैवद्य दाखवण्यासाठी, नैवेद्याचे ताट जेंव्हा भरलं जातं. त्यावेळी नैवद्य दाखवून झाल्यावर, त्यावर तुळशीपत्र ठेवलं जातं. जोवर आपण त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेऊन त्या ताटाभोवती पाणी फिरवत नाही, तोवर परमेश्वराला त्याचा भोग चढत नाही.अगदी असेच भागवत पंथात, पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यावर, आजपासून हा देह मी पांडुरंगाच्या चरणी वाहून दिला आहे. म्हणजे, भागवत धर्माचं पालन करत असताना, या सचेत देहावर माझा असा कोणताच अधिकार उरला नाहीये. तुळशी माळ घालणे म्हणजे, आपल्या शरीरावर तुळशीपत्र ठेवल्या प्रमाणेच आहे. आपल्या शरीरावर आपण तुळशीपत्र ठेऊ शकत नाही, त्यामुळे त्या तुळशीवृक्षा पासून बनलेली तुळशी माळ आपण परिधान करतो. म्हणजेच आपल्या शरीरावर एकप्रकारे आपण तुळशीपत्र ठेवत असतो, असा त्याचा मतितार्थ होतो.<br />#Tulshichimaal #Warkari #Pandharpur #Bhagavatpanth #lokmatbhakti #wari2022 <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा