राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका केली. तसेच यावेळी वरळी मतदारसंघावरून त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना टोला लगावला. <br /><br /><br />#AdityaThackeray #BJP #EknathShinde #VidhanSabha #AshishShelar #Devendrafadnavis #hwnews <br />
