<p>पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली गेली. त्यानंतर रात्रीच सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईला रवाना झाल्या आणि आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून शिवसेना नेत्या रेखा कोंढे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या रेखा कोंढे म्हणाल्या की, आज राज्यातील जनता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं दुःखात आहे. आपण घरात एवढं दुःख असेल तर दहा दिवस शिव ओलांडत नाही. असं असताना सुनेत्रा पवार तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला निघालात. 'सुनेत्रा पवार तुम्ही शपथ घेत असाल तरी महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे. हा सगळा प्रकार 'मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे', उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची एवढी घाई कशासाठी असा सवाल यावेळी कोंढे उपस्थित केला.</p>
