Surprise Me!

अपघाताचं सत्य काय आहे, हे चौकशीनंतरच समोर येईल, तोपर्यंत कुणीही अफवा पसरवू नयेत - चंद्रशेखर बावनकुळे

2026-02-02 1 Dailymotion

<p>नांदेड : अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू असून ब्लॅक बॉक्सही मिळालेला आहे. त्यामुळं अपघाताचं नेमकं कारण लवकरच समोर येणार आहे. या पार्श्वभूमीवर कुणीही अफवा पसरवू नये, असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा 'गेम' करेल, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करत म्हटलं की, "अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्यं करून महाराष्ट्राला कलंकित करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे, ती पुसण्याचं काम कुणीही करू नये. नाना पटोले यांनी वैचारिक मूल्यांकन करून जबाबदारीने बोलावं." याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचा अपघात की घातपात, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सरकार चौकशीबाबत पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्ट केलं आहे. "अपघाताचं सत्य काय आहे, हे चौकशीनंतरच समोर येईल. तोपर्यंत कुणीही अपप्रचार किंवा अफवा पसरवू नयेत," असं आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केलं. तसंच "निगेटिव्ह बोलण्याशिवाय संजय राऊत यांना काही येत नाही," असा जोरदार हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. दरम्यान, केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्राला भोपळा मिळाल्याचं विधान केलं होतं. त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संजय राऊत सकाळी उठल्यापासून सरकारवर टीका करतात. पण लोक आता त्यांच्या बोलण्याकडे गंभीरपणे पाहत नाहीत. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे आणि तरीही फक्त राजकीय स्टंटसाठी अशा प्रकारची भाषा वापरली जाते. राज्यातील विकासकामे आणि केंद्राच्या योजनांवर राऊत सतत टीका करत असले, तरी वास्तवात महाराष्ट्राला भरीव निधी मिळत आहे," असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.</p>

Buy Now on CodeCanyon