<p>पुणे : रुग्णांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना योग्य उपचार मिळावे यासाठी आयएससो मानांकित असलेल्या रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ असलेल्या जुन्नर येथील सय्यद वाडा येथे करण्यात आलं.</p><p>रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जुन्नर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, नवनिर्वाचित नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p><p>डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली आयएसओ मानांकित संघटना म्हणजे रुग्ण हक्क परिषद असून रुग्ण हक्क परिषदेची स्थापना ०८ एप्रिल २०१४ रोजी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क तथा अधिकार मिळालाच पाहिजे, यासाठीची जनमानसातील लोकप्रिय चळवळीतील संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद सुप्रसिद्ध आहे. रुग्ण हक्क परिषदेने कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान २०२५- २०२९ हे पाच वर्ष कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी समर्पित केलेले अभियान आहे. </p>
