<p>जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला सहा महिने उलटून गेलेत. मात्र मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 310 च कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती समोर आलीय. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी केवळ 731 अर्ज दाखल झालेले आहेत. मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी जरांगेंनी मुंबईत आंदोलन केलं. त्यानंतर सरकारनं जीआर काढत हैदराबाद गॅजेटिअर लागू केलं. मात्र मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत कुणबी प्रमाणपत्रासाठी 731 अर्ज दाखल झाले. त्यात केवळ 310 प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं. दरम्यान अधिकारी जाणूनबुजून प्रमाणपत्र देत नाहीयेत. याची तक्रार संबंधित मंत्र्यांकडे केली असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. यासह आज विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार असून या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. </p>
