Surprise Me!

युद्धामुळं कोणाला काहीच मिळत नाही उलट नुकसानच होतं, अनुप जलोटा यांनी व्यक्त केली भावना

2026-03-07 2 Dailymotion

<p>न्यूयॉर्क : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं आखाती देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यामुळं अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. या परिस्थितीमुळं आखाती देशांमधून विमानानं प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका बसत आहे. याबाबत गायक अनुप जलोटा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले "आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहेत. हळूहळू त्यांना भारतात आणलं जात आहे. मला अमेरिकेला जायचं आहे. परंतु, विमान सेवांची घडी विस्कळीत झाल्यामुळं मला कॅनडाला जावं लागत आहे. तिथून दुसऱ्या विमानानं मी अमेरिकेला जाईन. युद्धामुळं कोणालाही काहीच मिळत नाही. उलट सगळ्यांचं नुकसान होतं. हे व्हायलाच नको, अशी मी प्रार्थना करतो."</p>

Buy Now on CodeCanyon