<p>पश्चिम आशियातील इराण–इस्त्रायल संघर्षाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. महाराष्ट्रात कमर्शियल LPG चा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक उद्योग आणि हॉटेल व्यवसाय अडचणीत आले आहेत.</p><p>मुंबईतील BMC कॅन्टीनमध्ये गॅसची कमतरता निर्माण झाली असून, स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक स्टोव्हचा वापर करावा लागत आहे. दरम्यान, नागपुरातील उद्योग संघटनांच्या मते, राज्यातील सुमारे १० हजार उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि यामुळे २.५ ते ३ लाख रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे. एका महिन्यातच ₹५० हजार कोटींचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.</p><p>दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या वर गेल्यामुळे शेअर बाजारावरही मोठा परिणाम दिसून येतो आहे. सेन्सेक्समध्ये 1300 अंकांची घसरण झाल्यानंतर बाजार अजूनही अस्थिर असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.</p><p>अशाच Breaking News, Economy News, Maharashtra Industry Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.</p><p>#MaharashtraNews #SensexCrash #CrudeOilPrice #EconomicImpact #AsianetNewsMarathi<br> </p>
