<p>मुंबई- विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशोक खरात प्रकरणावर सविस्तर निवेदन करणार आहेत. यातून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आज विधान परिषदेत निरोप समारंभ पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी असे आठ आमदार निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे विधान परिषदेची कारकीर्द संपुष्टात येत असताना काय भावना व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यात या तिन्ही आमदारांना पुन्हा संधी मिळणार का? याचीही उत्सुकता आहे. त्याचबरोबर आज एमएमआर भागातील प्रश्न आणि कायदा सुव्यवस्था याबाबत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. विधानसभेत आणि विधान परिषदेत प्रश्न आणि लक्षवेधींमधून काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे. </p>
