<p>बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात खानवडी येथे शाळेचं उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाचं पूजनही करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवण्याचं कार्य महात्मा फुले यांनी केलंय. शिक्षण, शेती, सामाजिक समता आणि स्त्रीशिक्षणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान आजही मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांना बारा महिने उत्पन्न मिळावं आणि त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही महत्त्वाचं आहे. या शाळेच्या उभारणीत दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष सहकार्य लाभलं असून त्यांच्या पाठपुराव्यामुळंच हे काम पूर्ण होऊ शकलं. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे विचार प्रगल्भ असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः मुलींमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच नासा आणि इस्रोमध्ये पोहोचलेल्या मुलींच्या प्रेरणादायी प्रवासावर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात कौशल्य विकासावर भर देत एक हजार प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा सरकारचा मानस आहे." </p>
