देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यातील कामगिरीचे शरद पवार यांनी जाहीर कौतुक केले आहे. देशाच्या हितासाठी मोदी करत असलेल्या धोरणात्मक कामांवर विनाकारण टीका करणे चुकीचे असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मोदींच्या या दौऱ्यामुळे भारताचे भविष्य सुरक्षित होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असून राजकीय मतभेदांपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
