<p>जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. गावागावात सुरू असलेल्या बैठका 23 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहितीदेखील जरांगेंनी दिली. तसेच, 30 मे रोजी आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.</p><p>दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असून चर्चेतून मार्ग काढू, असं प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, “आम्ही सरकारविरोधात नाही. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. 23 तारखेपर्यंत मागण्यांची मंजुरी घेऊन अंतरवालीत या.” तसेच, “आमच्याशी दगाफटका करू नका. आम्ही सहसा कुणाला बोलावत नाही, पण तुम्हाला निमंत्रण दिलं आहे,” असा असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.</p>
