Surprise Me!

ग्रामीण भागात मिळणार शुद्ध पाणी, नाम फाऊंडेशनने बसवले वॉटर फिल्टर एटीएम

2026-05-30 0 Dailymotion

<p>बीड - पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ग्रामीण भागातील नागरिकांना जर स्वच्छ पाणी मिळाले तर येथील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल हे लक्षात घेऊन नाम फाउंडेशनने ग्रामीण भागातील 50 हून आधिक ग्रामपंचायतमध्ये वॉटर फिल्टर एटीएम.बसण्याचा निर्णय घेतलाच नाही तर प्रत्यक्षात फिल्टर बसवून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी गावातच उपलब्ध करून दिले आहे.</p><p>सर्वसामान्य व्यक्तीला चांगले आरोचे पाणी आपल्याच गावात उपलब्ध व्हावे या उद्देशाने नाम फाउंडेशनने पुढाकार घेत एक नव्हे दोन नव्हे तर 56 गावात ग्रामपंचायतमध्ये फिल्टर बसवले आहेत. त्यामूळे सर्वसामान्य नागरिकांना दोन किमी पायी रखरखत्या उन्हात जाण्याचा ताम कमी झाला आहे.  </p><p>आष्टी तालुक्यातील कारखेल खूर्द, म्हसोबाचीवाडी, दौलावडगावसह 10 ग्रामपंचायतमध्ये नाम फाउंडेशनच्या माध्यमातून या गावात वॉटर एटीएम फिल्टर बसण्यात आले आहेत. हे फिल्टर बसवल्याने येथील विशेष करुन महिला भगिनींना व बालकांना शुद्ध व अतिशय स्वच्छ व दर्जेदार पाणी गावातच उपलब्ध झाले आहे.</p>

Buy Now on CodeCanyon