आमचा अंदाज असा होता की या पाच-सहा दिवसांत त्यांना अटक करतील, आणि नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती? त्या माणसाचा राजीनामा ..का ? या संबंध शिक्षण चळवळीमध्ये त्यांची जी जबाबदारी होती ही जबाबदारी काळजीपूर्वक हाताळलेली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्याचं भविष्य अडचणीत आलंय. मी मागणी केली पण केंद्र सरकार याकडे बघ्याची भूमिका घेत होतं. शेवटी त्यांची मागणी एवढाच प्रश्न नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्यासोबत उभे राहिले. काँग्रेसच्या वतीने प्रतिनिधी गेले आणि राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया ताई गेल्या. इतर पक्षाचे लोक गेले.. आणि एक सामूहिक मागणी या ठिकाणी करत होते, आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे लक्षात आल्यानंतर वांगचुक यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आज पहाटे त्यांचं अटक सत्र सरकारनं केलं...त्यांना अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार...सरळ असं आहे ना की मागणी रास्त होती. पूर्ण करण्यासारखी होती. आणि सरकारने त्यांना नोटीस दिली होती...आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असताना देखील सरकारमधील लोक त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत...एवढा उद्दामपणा.. याचा अर्थ केंद्र सरकार अंत्यत बेजबाबदारपणे वागतेय असा आहे..आणि हे इथे थांबणार नाही, उद्या 14 तारखेला पार्लमेंट सुरु होईल, याविषयी पार्लमेंट मध्ये बोलला जाईल. <br /><br />#sonamwangchuk #sharadpawar #ncp #supriyasule #nda #shardpawar #marathinews #marathibatmya #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment
