सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून आणि अटकेवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे लज्जास्पद असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या चुका का लपवल्या जात आहेत?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनावरील सरकारचे नियंत्रण पूर्णपणे सुटले असून, सरकारने दडपशाही करण्याऐवजी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. विद्यार्थ्यांचे बळी जाईपर्यंत सरकार काय करत आहे, असा प्रश्न विचारत त्यांनी या सरकारला 'निर्दयी' असल्याचे संबोधले आहे. आता या आंदोलनासाठी मोठा मोर्चा काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे <br /><br />#SonamWangchuk #uddhavthackeray #cockroachjantaparty #cockroachjanatapartyprotest #marathinews #marathibatmya #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral
